शेतकऱ्यांना ‘ उतारा कोरा’ करण्याचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या आमदारांच्या खोट्या घोषणांचा आता पर्दाफाश होऊ लागला आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे मन जिंकण्यासाठी केलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष कारभारात त्यांची पूर्तता न झाल्याने, महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये रोषाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे साहेब यांनी थेट शेतकऱ्यांना आवाहन करत, खोट्या घोषणांचा पुराव्यानिशी पर्दाफाश करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ” शासनाने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने, त्याचे डिजिटल पुरावे आणि प्रत्यक्ष कोरे उतार्यांची हमी हे सर्व शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे स्पष्ट दाखले आहेत.”
यामध्ये पहिला ठोस पाऊल उचलत, श्रीरामपूर येथील युवराज जगताप या शेतकऱ्याने, खोट्या आश्वासनाविरोधात अधिकृत गुन्हा दाखल केला आहे . हे या व्यापक आंदोलनाची पहिली ठिणगी ठरू शकते.
विशेष म्हणजे, अजित काळे साहेब यांनी संपूर्ण राज्यात वकीलांची मोफत टीम तयार केली असून,*ज्यांना फसवणुकीविरोधात तक्रार द्यायची आहे, *त्यांनी संपर्क साधावा,* असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय सोशल मीडियावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कशी करावी, याची पीडीएफ मार्गदर्शिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.*
“थांबला तो संपला” या घोषवाक्याने प्रेरित होऊन काळे साहेबांनी भाषणाच्या पुढे जाऊन कृती दाखवली आहे. आता ही मोहीम न्यायालयीन लढाईत प्रवेश करत आहे. शासन दरबारी शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी ही कृती अत्यंत मोलाची ठरणार आहे.