spot_img
spot_img
HomeUncategorizedवा.वी. काळे गुरुजी – एका तत्त्वनिष्ठ शिक्षकाचा आदर्श प्रवास

वा.वी. काळे गुरुजी – एका तत्त्वनिष्ठ शिक्षकाचा आदर्श प्रवास

शब्दांकन
डॉक्टर संजय सुकाळकर

💐 सुकाळकर परिवाराच्या वतीने
गुरुजींना पुण्यतिथी निमित्त
भावपूर्ण श्रद्धांजली
आपण आम्हाला दिलेला *प्रकाशकिरण कायम आमच्या आठवणीत राहील…
🕊️🌼🙏

श्रद्धांजली लेख

वा.वी. काळे गुरुजी… जुन्या पिढीतील ते एक नाव, जे अजूनही तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाच्या आणि विद्यार्थ्याच्या स्मरणात आदराने उच्चारले जाते. “वा.वी.” हे केवळ एक संक्षेप नव्हे, तर त्यांच्या तपस्वी आयुष्याचं व्रत सांगणारा एक सन्मानचिन्ह होता.

गुरुजी म्हणजे उंच, सडसडीत शरीरयष्टी, ताठ उभा चेहरा, एक टांगी धोतर, आणि हातात असलेला धोतराचा कोसा… साधेपणा आणि स्वाभिमान यांचं जिवंत प्रतीक. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिखावा नव्हता, पण विचारांची ठसठशीत ताकद होती. जे मनात, तेच तोंडावर – कोणालाही खुशामतीचा मोह नव्हता, ना कुणासमोर झुकण्याची तयारी.

गावच्या, समाजाच्या आणि शैक्षणिक क्षेत्राच्या हितासाठी अखंड झटणाऱ्या या गुरुजींचं जीवन म्हणजे तत्त्व, निष्ठा आणि कर्तव्यपरायणतेचा अविरत प्रवास होता.

एक कुटुंबवत्सल माणूस

गुरुजींनी आपल्या सहजीवनात केवळ शाळेपुरतेच मर्यादित राहून काम केले नाही. ते गावकऱ्यांमध्ये, नातेसंबंधांतही आपुलकीने वागत. आमच्या कुटुंबाशी त्यांचे जावयाच्या नात्याने जुळलेले नाते हे फक्त औपचारिक नव्हतं – त्यामध्ये प्रेम, स्नेह, आणि आपुलकीचा अस्सल गंध होता. माझ्या आई-वडिलांना ते स्वतःच्या लेकरांसारखे प्रेम देत, आणि आम्हालाही त्यांच्या तोंडून सतत चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.

अध्यात्म आणि श्रद्धेचा दिप

गुरुजींच्या जीवनात अध्यात्माचं स्थान खूप मोठं होतं. भास्करगिरी महाराजांवरील अपार श्रद्धा त्यांच्या आचारविचारांमध्ये दिसून यायची. ते केवळ शिक्षणसंस्थेचेच नव्हे, तर एक विचारवंत समाजसुधारक होते. त्यांचे जीवन हे ज्ञान आणि श्रद्धा यांचं संतुलन साधणाऱ्या माणसाचं उदाहरण होतं.

राजकीय जाण, सामाजिक समर्पण

गुरुजी हे आदरणीय स्व. सहकार महर्षी मारुतराव घुले पाटील यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते होते. जिल्ह्याच्या सहकार, शिक्षण, व सामाजिक क्षेत्रात मारुतरावसाहेबांनी जो भक्कम पाया रचला, त्यामध्ये गुरुजींचं योगदान नेहमीच आधारवडासारखं होतं. त्यांची तळमळ, प्रामाणिकता व निष्ठा पाहून साहेबांनीही त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला होता. पुढे यशवंतरावजी गडाख व डॉ. नरेंद्रजी घुले साहेबांच्या नेतृत्वातही गुरुजींनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडताना एक सजग व संवेदनशील प्रतिनिधी म्हणून कार्य केले.

संस्थात्मक योगदान

प्राथमिक शिक्षक बँक, गुरुकुल मंडळ, ऐक्य मंडळ यासारख्या संस्थांच्या उभारणीत गुरुजींचा मोठा वाटा होता. त्यांनी शिक्षकी जीवन केवळ उपजीविकेपुरते मर्यादित ठेवले नाही, तर शिक्षक समाजाची एकता, विकास आणि सन्मान टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहिले.

एका युगाचा अंत

धनवटे गुरुजी, सुतार गुरुजी, ठुबे गुरुजी, पोखरकर गुरुजी, भा.दा.पाटील – या आदरणीय शिक्षकांच्या पंक्तीतले शेवटचे गुरुजी हे होते. त्यांचे अचानक जाणे ही फक्त एक व्यक्तीची हानी नव्हे, तर वाकडी गावाच्या शैक्षणिक व सामाजिक भूषणाचा एक आधार कोसळल्यासारखं आहे.

निष्कलंक, निरपेक्ष प्रेम

गुरुजींच्या वागण्यात ना अपेक्षा, ना आकांक्षा. त्यांनी केवळ आपुलकी पेरली, प्रेम दिलं आणि आदर्श निर्माण केला. त्यांच्या जाण्याने एक सच्चा शिक्षक, एक मार्गदर्शक, आणि माणुसकीचा आधार गमावला आहे.


Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
27 ° C
27 °
27 °
74 %
7.3kmh
100 %
Mon
27 °
Tue
26 °
Wed
28 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!