पावसाळी अधिवेशनात आमदार विठ्ठलराव लंघे यांचे पाचवे दमदार भाषण
नेवासा (प्रतिनिधी) –
नेवासा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी गुरुवार (दि.१७) रोजी पावसाळी आधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत , नेवासा मतदार संघात मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसाने शेती पिकांचे प्रंचड नुकसान होवून गोरगरीबांच्या घरांची सोसाट्याच्या वाऱ्याने प्रचंड दाणादान होवून पडझड झालेली आहे तर अवकाळी पाऊसाने नेवासा तालुक्यात कांदा,केळी,सोयाबीन आणि बाजरी या मुख्य पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचा लाभ सरसकट व तात्काळ मिळावा अशी प्रभावी मागणी – यांनी गुरुवारी औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन विधानसभेच्या सभापतींकडे केली आहे
आता पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईची आशा पल्लवित झाली आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी विधानसभेच्या सभापतींचे विशेष लक्ष वेधतांना ते म्हणाले की,माझा नेवासा तालुका हा ग्रामीण स्वरूपाचा भाग असून सुमारे ८० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि माहे मे आणि जून २०२५ दरम्यान अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून घरांची पडझड झालेली आहे असा मुद्देसुद प्रश्न सभापतींकडे उपस्थित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा सरकारच्या भूमिकेडे लागून आहेत.
.