नाथांचे कार्य हे अलौकिक स्वरूपात असून त्यांनी आपलं समस्त जीवन जगातील सुखदुःखांमध्ये असणारे सर्व जाती धर्मातील मंडळींना एकत्र ठेवून जगत उद्धाराचे कार्य केले तीच परंपरा वारकरी संप्रदाय पुढे चालवत आहे असे प्रतिपादन निलेश महाराज रोडे यांनी केले
तालुक्यातील गोमळवाडी येथे जोगेश्वरी जगदंबा देवीचे मंदिरामध्ये 30 मे पासून सुरू झालेल्या नवनाथ गाथा पारायण सोहळा व हरिनाम सप्ताह च्या काल्याचे प्रवचनामध्ये ते बोलत होती
नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सजवलेल्या घोड्याच्या रथातून महाराजांची व ग्रंथाची भव्य मिरवणूक गोमळवाडी गावातून काढण्यात आली या मिरवणुकीला गावातील सर्व महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने हजर होते मिरवणुकी समोर वाद्यरुंद तसेच फटाक्यांची बाजी करण्यात आले
सोहळ्याला देवगडचे प्रकाशानंद गिरी महाराजांनी आणि ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के यांनी आवर्जून भेट घेऊन मार्गदर्शन केले होते

या पारायण सोहळ्याच्या काल्याचे किर्तन निलेश महाराज रोडे यांचे झाले यावेळी सोहळ्याला सर्व प्रकारे सहयोग व मदत करणाऱ्या भाविकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व महाप्रसादाची वाटप करण्यात आले
देवगडचे सेवेकरी बबन महाराज आरसुळे,अण्णाभाऊ आरसुळे ,अशोक गाडेकर ,ह भ प अनिकेत महाराज , गायनाचार्य धनंजय महाराज जाधव ,अमोल महाराज जगताप ,राजूभाऊ पवार, मच्छिंद्र आरसुळे, एकनाथ माकोणे, बापूसाहेब आरसुळे तसेच मंडप व्यवस्थ करणारे गुरुकृपा मंडप डेकोरेशन शेणवडगाव ,महाप्रसादाचे अन्नदाते सिताराम माकोडे बाळासाहेब शिरसागर योगेश गुलदगड आणि संत पूजन करणारे नामदेव गाडेकर यांचे आणि पाणी दान करणारे सोपानराव बोरुडे यांचे सर्वांनी आभार मानले
सदरच्या नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा व हरिनाम असल्याने संपूर्ण गावांमध्ये भक्तीमय वातावरणहोते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला