नेवासे (प्रतिनिधी) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासे येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या आषाढी वारीतील पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी अंतिम गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी ठीक 9वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सोहळ्याशी संबंधित सर्व बाबींवर चर्चा होणार असून, दिंडीच्या सुयोग्य आयोजनासाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या बैठकीस प्रमुख वेदांताचार्य देविदासजी महाराज म्हस्के, गाथामूर्ती रामभाऊ राऊत, ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासकर,हरिभक्त परायण राम महाराज झिंजुर्के, संस्थेचे अध्यक्ष व मा. आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त मंडळाचे सदस्य, जिल्ह्यातील प्रमुख महाराज मंडळी तसेच पालखीत सहभागी होणाऱ्या सर्व दिंडी चालक यांची उपस्थिती अनिवार्य आहे.
दिंडी मार्गातील व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, भोजन, निवास, वैद्यकीय सुविधा, पोलीस बंदोबस्त यांसह विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन ज्ञानेश्वर मंदिर संस्थान तर्फे करण्यात आले आहे.