
(नेवासा प्रतिनिधी) :- पुरंदर विमानतळास जमिनी देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यावर लाठीचार्ज करणाऱ्या महायुती सरकारचा आज नेवासा येथे काँग्रेस व विविध संघटनाकडून जाहिर निषेध करण्यात आला.
पुरंदर विमानतळास येथील स्थनिक सात गावांचा प्रखर विरोध असून
एकतपूर या गावात पुरंदर विमानतळ जमिनीसाठी ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या सरकारी यंत्रनेस स्थानिक शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने विरोध केला. आम्ही आमच्या जमिनी विमान तळास देणार नाही, सर्वेक्षण बंद करा अशी ठाम भूमिका येथील स्थानिक शेतकऱ्याकडून घेण्यात आली. याठिकाणी रस्त्यावर गाडी बैलासह पूर्ण गावाकऱ्यांनी आंदोलन करत विरोध दर्शवीला परंतु या विरोधास पोलिसांकडून जोरजबरदस्तीने मोडून काढण्याच्या प्रयत्नात आंदोलनानी वेगळे वळण घेतले पोलिसांनी शेतकऱ्यांवर अस्रूधुराच्या नळकांड्या सोडत, स्थानिक शेतकऱ्यावर अमानुष लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये शेतकरी महिलेने आपला जीव गमावला.तर शेकडो शेतकरी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या या लाठीचार्जचा महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांकडून निषेध करण्यात आला.आज नेवासा तालुक्यात काँग्रेसकडून शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी सत्ता आल्यावर पूर्ण कर्जमाफीची घोषणा करणारे कर्जमाफी दूरच आता शेतकऱ्याच्या जमिनी हिसकावून घेत आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हिटलरशाही सरकार असून कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी यांच्यापुढे झूकू नये.
शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी काँग्रेस पक्ष शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम असून पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीचार्जचे आदेश देणारे कोण होते हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.लाठीचार्ज करणारे पोलीस जनरल डायर पेक्षाही क्रूर असून यांना निलंबित केलेच पाहिजे. असे स्पष्ट मत व्यक्त केले.शेतकरी संघटनाचे त्रिंबक भदगले यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव व शेतकरी संघटना या पुरंदच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी या जुलमी सरकारला उखडून फेकावे असे स्पष्ट केले. स्वाभिमानी संघांचे गणपत मोरे यांनी पुरंदर घटनेचा जाहीर निषेध करत याविरोधात पूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने करण्याचा ईशारा दिला. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव काळे यांनी शेतकरी सरकारला धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा दिला, तसेच यावेळी बसपाचे हरीश चक्रनारायण, स्वाभिमानी संघांचे गणपत मोरे, मराठा संघांचे गणेश झगरे, आदिनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब पटारे, ऍड. सागर सागडे, ऍड. ज्ञानेश्वर शिरसाठ, ऍड. बाबासाहेब कावले, गुलाबभाई पठाण, संजय होडगर, युसूफ शेख, विजय शिंदे, दिगंबर आवारे, शेषराव गव्हाणे, दत्तात्रय निकम,असिफ पटेल आदिसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी नेवासा तहसीलदार संजय बिरादार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.